20.1 C
New York
Friday, April 17, 2026

Buy now

spot_img

चोरांचा हक्काचा वाटा’ झालेले वारंगा फाटा: ‘सुरक्षित’ बाजार भरवण्यासाठी पोलीस प्रशासन झोपेत!

लक्ष द्या! वारंगा फाटा बाजारात ‘चोरांचा सुळसुळाट’: गोरगरिबांच्या लुटीने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

प्रजाशाहीचा आवाज  विशेष प्रतिनिधी राजू दीपके 

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथील आठवडी बाजार गेल्या अनेक वर्षांपासून परिसरातील शेतकरी आणि शेतमजुरांसाठी जीवनरेखा ठरला आहे. मात्र, अलीकडच्या काळात हा बाजार गोरगरीब जनतेसाठी नव्हे, तर चोरांसाठी ‘सोनेरी’ संधी बनला आहे! गेल्या काही महिन्यांपासून येथे खिसे कापण्याचे, मोबाईल चोरण्याचे आणि वृद्ध महिलांच्या गळ्यातील सोन्या-चांदीच्या वस्तू लंपास करण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत, ज्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ताज्या घटनेने उघड केली गंभीर स्थिती:

दिनांक २०/११/२०२५ रोजी कळमनुरी तालुक्यातील फुटाणा येथील एका वृद्ध महिलेचे हातातील चांदीचे कडे, दंड कडे दिवसाढवळ्या चोरीला गेले, तसेच अनेक बाजारकऱ्यांचे मोबाईलही लंपास झाले. या घटनांमुळे बाजारात किती मोठ्या प्रमाणात चोरांचा उपद्रव वाढला आहे, हे स्पष्ट होते.

प्रशासन आणि पोलिसांची ‘उदासीन’ भूमिका:

सातत्याने चोरीच्या घटना घडत असतानाही, जवळील पोलिस स्टेशन आणि प्रशासनाने यावर कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही, हे अत्यंत गंभीर आहे. गोरगरीब शेतकरी-शेतमजूर तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचत नाहीत किंवा तक्रार देऊनही त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. या प्रतिक्रियाशून्यतेमुळे चोरांना एकप्रकारे मोठी ऊर्जा मिळत आहे आणि त्यांच्या धाडसी कृत्यांना प्रोत्साहन मिळत आहे

जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलिसांना आणि प्रशासनाला या गंभीर समस्येची दखल घेण्यासाठी आणखी किती मोठ्या घटना घडण्याची वाट पाहावी लागणार आहे?

: आठवडी बाजारासारख्या गर्दीच्या ठिकाणी साधे साधे पोलीस गस्त किंवा गुप्त पाळत ठेवण्याची तसदीही का घेतली जात नाही? गोरगरीब जनतेच्या हक्काच्या पैशांची आणि वस्तूंची लूट होत असताना प्रशासन मूग गिळून का बसले आहे?

या घटनांमुळे परिसरातील वृद्ध पुरुष आणि महिलांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या चोरांना वेळीच रोखले नाही, तर सामान्य जनता बाजारात येण्यास कचरू लागेल आणि त्यांच्या दैनंदिन जीवनावर नकारात्मक परिणाम होईल.

तातडीची मागणी:

जवळीक पोलीस स्टेशन आणि प्रशासनाने त्वरित जागे होऊन या चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना कराव्यात. चोरांना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच बाजाराच्या दिवशी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्याची तातडीने व्यवस्था करावी. अन्यथा, वारंगा फाटा बाजार हे ‘चोरांचे हक्काचे मैदान’ बनण्यास वेळ लागणार नाही!

 

spot_img

Related Articles

जिंतूर पंचायत समितीवर भाजपचे वर्चस्व; सभापती-उपसभापतींचा पदग्रहण सोहळा आज उत्साहात पार पडणार

जिंतूर (प्रतिनिधी): सागर पुंडगे  स्थानिक राजकारणात आपला दबदबा कायम राखत जिंतूर पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती आणि उपसभापतींचा पदग्रहण सोहळा आज, मंगळवार दिनांक १७ मार्च २०२६...

काय तर म्हणे बांग्लादेशात हिंदूंवर अत्याचार, तरीही केंद्र सरकार बांगलादेशला ५ हजार टन डिझेल देणार “हे कसले हिंदुत्व?” — सोशल मीडियावर सरकारवर जहरी टीका 

  नवी दिल्ली विशेष प्रतिनिधी    जगभरात अमेरिका–इराण–इस्त्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तेलसंकटाची भीती व्यक्त होत असताना भारतातही इंधन दरवाढ, तुटवडा आणि महागाईने सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!