2.8 C
New York
Thursday, February 19, 2026

Buy now

spot_img

उड्डाणपूल की निधी उडवण्याची योजना? MMRDA वर गंभीर आरोप विकासाच्या नावाखाली 100 कोटींचा अपव्यय?

100 कोटींचा उड्डाणपूल की MMRDA चा उडता विनोद?

मीरा-भाईंदरमध्ये चारपदरी पूल अचानक दोनपदरी; ‘विकास’ की थेट निधीची लूट?

मीरा-भाईंदर | विशेष प्रतिनिधी

भोपाळमधील 90 अंश वळणाच्या पुलाने देशभरात हास्य आणि संताप निर्माण केल्यानंतर आता महाराष्ट्रातील मीरा-भाईंदरमध्ये MMRDA च्या ‘अद्भुत इंजिनीअरिंगचा’ नवा नमुना समोर आला आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेला दुमजली उड्डाणपूल चारपदरी असल्याचा गवगवा करण्यात आला, मात्र प्रत्यक्षात हा पूल अचानक दोनपदरी करण्यात आल्याने तब्बल 100 कोटी रुपयांवर पाणी फेरले गेले आहे.

हा विकास आहे की नियोजनाचा बोजवारा? असा थेट सवाल आता सामान्य नागरिक विचारत आहेत.

आराखडा कुणासाठी? वापर कुणासाठी?

MMRDA ने मीरा-भाईंदरमध्ये तीन ठिकाणी दुमजली उड्डाणपूल उभारण्याचा दावा केला. वाहतूक कोंडी कमी होईल, वेळ वाचेल, शहर आधुनिक बनेल—अशा घोषणा करण्यात आल्या. पण प्रत्यक्षात एका पुलावर चार पदरी रस्ता थेट दोन पदरी होत असल्याचे चित्र समोर आले आणि संपूर्ण प्रकल्पच संशयाच्या भोवऱ्यात सापडला.

चार पदरी पूल बांधायचा, पण वापर दोन पदरीचा—हे कसले इंजिनीअरिंग? की आधी ठेकेदाराचे बिल फुगवायचे आणि नंतर नागरिकांनी तडजोड करायची?

100 कोटी कुणाच्या खिशात?

या पुलासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर झाला, कामे मंजूर झाली, देयके अदा झाली. मग प्रश्न असा आहे की,

चारपदरी पूल दोनपदरी का झाला?

जागेचा, वळणाचा, वाहतुकीचा अभ्यास आधी का केला नाही?

चूक माहिती असूनही काम सुरू का ठेवले?

जर ही चूक असेल तर ती गुन्हेगारी निष्काळजीपणा आहे. आणि जर जाणूनबुजून केले असेल, तर हा थेट आर्थिक गैरव्यवहार नाही का?

सोशल मीडियावर संतापाचा उद्रेक

सदर पुलाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून MMRDA च्या कार्यपद्धतीवर नागरिक अक्षरशः संताप व्यक्त करत आहेत.

“इंजिनीअरिंग कॉलेजची प्रोजेक्ट वाटते”,

“करदात्यांचे पैसे रस्त्यावर फेकले”,

“पूल आहे की बाटलीचं तोंड?”

अशा तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

जबाबदारी कुणाची? उत्तर देणार कोण?

या प्रकरणात एकाही अधिकाऱ्याची जबाबदारी निश्चित होताना दिसत नाही. आराखडा मंजूर करणारे, तांत्रिक सल्लागार, प्रकल्प व्यवस्थापक, ठेकेदार—सगळेच गप्प का आहेत?

MMRDA च्या नावाखाली सुरू असलेला हा ‘विकास’ प्रत्यक्षात अकार्यक्षमता, नियोजनशून्यता आणि संभाव्य भ्रष्टाचाराचे जिवंत उदाहरण ठरत आहे.

चौकशी नाही, तर हे सुरूच राहणार!

आज हा पूल, उद्या आणखी एखादा. चौकशी झाली नाही, दोषींवर कारवाई झाली नाही, तर मीरा-भाईंदरच नव्हे तर संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात अशाच प्रकारे कोट्यवधींची उधळपट्टी सुरूच राहणार, हे निश्चित.

जनतेचे पैसे हे कोणाच्याही प्रयोगशाळेचे साहित्य नाहीत.

MMRDA ने तात्काळ खुलासा करावा, जबाबदारी निश्चित करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी—ही आता मागणी नव्हे, तर लोकांचा इशारा आहे.

spot_img

Related Articles

आदर्श ग्रामपंचायत कुरुंदवाडीत पंजाब राज्यातील निर्वाचित पदाधिकाऱ्यांचा अभ्यास दौरा

आदर्श ग्रामपंचायत कुरुंदवाडीत पंजाब राज्यातील निर्वाचित पदाधिकाऱ्यांचा अभ्यास दौरा कुरुंदवाडी | प्रतिनिधी : संदीप इंगोले आदर्श ग्रामपंचायत कुरुंदवाडी येथे दि. ३० जानेवारी २०२६ रोजी पंजाब राज्यातील...

औंढ्यात वंचित बहुजन आघाडीची वज्रमुठ; ९ गट आणि १८ गणांत शड्डू ठोकणार!

जिल्हाध्यक्ष अनिल कांबळे यांचे कार्यकर्त्यांना ‘गाव तिथे शाखा’ उभारण्याचे आवाहन औंढा नागनाथ: आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने आतापासूनच कंबर कसली...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!