2.7 C
New York
Saturday, February 21, 2026

Buy now

spot_img

बेरुळा गावातील बौद्ध बांधवांनी निळ्या झेंड्याच्या सन्मानार्थ घडवलेली ऐतिहासिक क्रांती! कुतुहल व कौतुकाचा विषय ठरत आहे.

बेरुळा गावातील बौद्ध बांधवांनी निळ्या झेंड्याच्या सन्मानार्थ घडवलेली ऐतिहासिक क्रांती! कुतुहल व कौतुकाचा विषय ठरत आहे.समगा येथे बेरुळा येथील बौद्ध बांधवांचा जाहीर सन्मान हिंगोली जिल्ह्यातील बेरुळा गावाच्या बौद्ध समाजाने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात एक ऐतिहासिक क्रांती घडवली आहे. निळ्या झेंड्याच्या सन्मानार्थ केलेल्या लाँग मार्च व बिऱ्हाड आंदोलनाने जिल्ह्यातील असंख्य बौद्ध बांधवांच्या मनात नवी स्फूर्ती निर्माण केली असून, बेरुळा येथील बौद्ध बांधवांचे कार्य आज सर्वत्र कौतुकाचे आणि प्रेरणादायी ठरले आहे.

दि. 19 ऑक्टोबर 2025 रोजी समगा (ता. जि. हिंगोली) येथे बौद्ध समाजाने बेरुळा गावातील बौद्ध बांधवांचा सार्वजनिक सन्मान केला. या वेळी लढाऊ महिलांबरोबर पुरुष आणि तरुणांनी अन्यायाविरुद्ध ठामपणे आवाज उठवला. त्यांनी ठामपणे सांगितले, 

“कतई अन्याय सहन करायचा नाही. आपल्या वर झालेला अन्याय जगाला ओरडून सांगावा, व्यवस्थेला इशारा द्यावा — आम्ही गुलाम नाही. देशात लोकशाही आहे, कायद्यापुढे सर्व समान आहेत.” 

या संदेशाने उपस्थितांमध्ये जोश, आत्मविश्वास आणि एकता वाढीस लागली.

बेरुळा गावातील बौद्ध समाजाने लाँग मार्च व बिऱ्हाड आंदोलन केले. स्थानिक प्रशासनाला अन्यायाची माहिती दिली. आंदोलकांनी आपला प्रतिकार शांततामय मार्गाने नोंदवला, त्या माध्यमातून समाजाचे प्रश्न वृत्तपत्रे, समाजमाध्यमे आणि स्थानिक प्रशासनापर्यंत पोहोचवले.

 

या क्रांतीकडे जिल्ह्यातील अनेक गावांनी लक्ष दिले आहे. बेरुळा गावातील बांधवांचे काम कौतुकास्पद ठरले आहे आणि त्याचा आदर्श इतर गावांनीही स्वीकारण्यास सुरुवात केली आहे.

समाजातील सदस्यांचा सन्मान

समगा येथे आयोजित सन्मान सोहळ्यात जिल्ह्यातील बौद्ध समाजाच्या प्रतिनिधी, युवक-युवती, महिला उपस्थित होत्या. बेरुळा गावातील बांधवांना पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह आणि सार्वजनिक शाबासकी देण्यात आली. 

याचे प्रमुख उद्दिष्ट होते — समाजातील लढाऊ वृत्ती, अन्यायाविरुद्ध आवाज, आणि लोकशाही मूल्यांच्या पाठिशी उभे राहण्यास प्रोत्साहन देणे.

या आंदोलनामुळे जिल्ह्यातील बौद्ध समाज अधिक सशक्त आणि जागृत झाला आहे. खऱ्या अधिकाराची जाणीव, कायदा-सुव्यवस्था व सामाजिक न्याय यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, हा संदेश सर्वत्र पोहोचला. 

बेरुळा गावातील महिला, पुरुष आणि तरुणांना दिलेला सन्मान समाजाच्या एकजूट आणि लढाऊ वृत्तीचा अभिमान वाढवणारा ठरला आहे.

spot_img

Related Articles

आदर्श ग्रामपंचायत कुरुंदवाडीत पंजाब राज्यातील निर्वाचित पदाधिकाऱ्यांचा अभ्यास दौरा

आदर्श ग्रामपंचायत कुरुंदवाडीत पंजाब राज्यातील निर्वाचित पदाधिकाऱ्यांचा अभ्यास दौरा कुरुंदवाडी | प्रतिनिधी : संदीप इंगोले आदर्श ग्रामपंचायत कुरुंदवाडी येथे दि. ३० जानेवारी २०२६ रोजी पंजाब राज्यातील...

उड्डाणपूल की निधी उडवण्याची योजना? MMRDA वर गंभीर आरोप विकासाच्या नावाखाली 100 कोटींचा अपव्यय?

100 कोटींचा उड्डाणपूल की MMRDA चा उडता विनोद? मीरा-भाईंदरमध्ये चारपदरी पूल अचानक दोनपदरी; ‘विकास’ की थेट निधीची लूट? मीरा-भाईंदर | विशेष प्रतिनिधी भोपाळमधील 90 अंश वळणाच्या पुलाने...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!