सोमनाथ सूर्यवंशी न्यायालयीन कोठडीतील मृत्यू प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे राज्याच्या पोलीस महासंचालकांना (डीजीपी) एका आठवड्यात विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत.
महाराष्ट्र सरकारने नियुक्त केलेली चौकशी समिती बरखास्त केली जाईल, आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यूशी संबंधित सर्व कागदपत्रे नवीन तपास पथकाकडे सोपवली जातील.
जर याचिकाकर्त्या विजयाबाई व्यंकट सूर्यवंशी यांना विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) सदस्यांवर काही आक्षेप असेल तर त्या न्यायालयात आपला आक्षेप नोंदवू शकतात.
आज, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात विजयाबाई व्यंकट सूर्यवंशी विरुद्ध महाराष्ट्र राज्य आणि इतर या खटल्याची सुनावणी झाली. विजयाबाई सूर्यवंशी यांच्यावतीने ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी कोर्टात युक्तिवाद केला.
#JusticeForSomanathSuryawanshi
#PrakashAmbedkar #BreakingNews





