22.1 C
New York
Monday, September 14, 2026

Buy now

spot_img

डॉ. आंबेडकर चौकाचा तिढा सुटला! बेरुळा आंदोलनाला संविधानिक मार्गाने ‘न्याय’

प्रजाशाहीचा आवाज:  विशेष प्रतिनिधी मोहित सोनवणे 

 पुन्हा अभिमानाने उभा राहणार डॉ. आंबेडकर चौक आणि अस्मितेचा निळा ध्वज सन्मानाने फडकणार.

 

  ‘रणरागिणी’ महिलांच्या एकजुटीचा विजय: अन्नत्याग आंदोलनात महिलांचा निर्णायक सहभाग; ‘आंबेडकर नावासाठी जिवाची बाजी’ लावणाऱ्या महिलांना निळा सलाम.

 

  नेत्यांच्या पुढाकाराने तिढा संपुष्टात: आमदार राजू नवघरे, मधुकर मांजरमकर, दादासाहेब शेळके आणि दिनेश हनुमंते यांच्या मध्यस्थीला यश.

 शांततापूर्ण आंदोलनाचा जयघोष: लोकशाही मार्गाने न्याय मिळवल्याबद्दल नागरिकांकडून आनंद व्यक्त.

 

बेरुळा (हिंगोली): बेरुळा (ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाच्या उद्ध्वस्तीकरणामुळे निर्माण झालेला गंभीर वाद अखेर संविधानिक आणि शांततापूर्ण मार्गाने संपुष्टात आला आहे. बेरुळा येथील बौद्ध महिला आणि पुरुषांनी न्याय मागण्यासाठी सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन यशस्वी झाले असून, प्रशासनाने उद्ध्वस्त केलेला चौक पुन्हा अभिमानाने उभा करण्याची आणि अस्मितेचा निळा ध्वज सन्मानाने फडकवण्याची मागणी मान्य केली आहे.

 चौकाच्या उद्ध्वस्तीकरणाने तीव्र संताप

काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद बांधकाम विभाग, औंढा तहसील प्रशासन आणि स्थानिक पोलीस दलाने संयुक्त कारवाई करत बेरुळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक उद्ध्वस्त केला होता. या अन्यायकारक कृतीमुळे स्थानिक बौद्ध समाजात आणि रिपब्लिकन चळवळीच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप उसळला होता. या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी बेरुळा येथील नागरिकांनी दि. 03 नोव्हेंबर 2025 पासून हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते.

 रणरागिणी महिलांचा निर्णायक सहभाग

या आंदोलनाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे बौद्ध महिलांचा सहभाग अत्यंत निर्णायक आणि प्रेरणादायी ठरला. “आंबेडकर नावासाठी जिवाची बाजी लावणाऱ्या शूर रणरागिणी महिलांना” या निमित्ताने निळा सलाम करण्यात आला. महिलांनी दाखवलेल्या एकजुटीमुळे आणि त्यांच्या ठाम भूमिकेमुळे प्रशासनावर योग्य तो दबाव निर्माण झाला आणि हा संवेदनशील तिढा सोडवणे प्रशासनाला भाग पडले.

 प्रमुख नेत्यांच्या मध्यस्थीने तिढा सुटला

सदर संवेदनशील विषयावर तोडगा काढण्यासाठी स्थानिक नेते आणि रिपब्लिकन चळवळीतील ज्येष्ठ मंडळींनी पुढाकार घेतला. आमदार राजू नवघरे, रिपब्लिकन ज्येष्ठ नेते मधुकर मांजरमकर, भीम टायगर दादासाहेब शेळके, आणि रिपब्लिकन नेते दिनेश हनुमंते दीपक केदार यांनी प्रशासनाशी चर्चा करून मध्यस्थी केली. या सर्व नेत्यांनी आंदोलकांची बाजू संविधानिक पद्धतीने आणि संयमाने मांडत, चौकाची पुनर्बांधणी करण्याची आणि अस्मितेचा सन्मान कायम ठेवण्याची मागणी लावून धरली.

त्यांच्या सामूहिक आणि संयमी प्रयत्नांतून अखेर प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत, चौकाची पुनर्स्थापना करण्याच्या मागणीला अधिकृत मान्यता दिली. हा तिढा सुटल्यामुळे बेरुळा आणि परिसरातील नागरिकांनी प्रचंड आनंद व्यक्त केला आहे. शांतता आणि संविधानिक मार्गाचा अवलंब करून मिळवलेला हा विजय, लोकशाही मूल्यांवरचा विश्वास अधिक दृढ करणार आहे

spot_img

Related Articles

महाराष्ट्र तेलंगाणा चेक पोस्ट बनले ‘रामभरोसे’! झुडपांनी रस्ता गिळला; वाहतुकीची कोंडी आणि सुरक्षेवर गंभीर प्रश्न — वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष कधी जाणार?

  महाराष्ट्र तेलंगाणा चेक पोस्ट बनले ‘रामभरोसे’! झुडपांनी रस्ता गिळला; वाहतुकीची कोंडी आणि सुरक्षेवर गंभीर प्रश्न — वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष कधी जाणार? प्रतिनिधी अमोल शेरे बिलोली : महाराष्ट्र–तेलंगणा...

शक्तीपीठ महामार्गावर राजू शेट्टी आक्रमक; “एक इंचही जमीन देणार नाही!”

शक्तीपीठ महामार्गावर राजू शेट्टी आक्रमक; “एक इंचही जमीन देणार नाही!” शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर सरकारला इशारा; भूसंपादन आणि जमीन मोजणीला विरोध   महाराष्ट्र : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोध...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!